या प्रकरणात समय रैनासोबत विपुल गोयल, बलराज घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांनाही दिलासा मिळाला आहे. ‘India’s Got Latent’मधील दिव्यांग व्यक्तींशी संबंधित कथित आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर या सर्वांविरोधात विविध ठिकाणी FIR दाखल करण्यात आले होते.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने आरोपींनी यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे पालन केल्याचीही दखल घेतली.
समय रैना आणि इतरांनी दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यासोबतच निधी उभारण्याचे प्रयत्न केले होते. न्यायालयाने या प्रयत्नांची प्रशंसा केली. प्रामाणिकपणे सकारात्मक दिशेने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात, असा संदेशही न्यायालयाने दिला.
या आदेशानंतर समय रैना आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधातील फौजदारी कारवाई बंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचे व्यापक पैलू न्यायालयाच्या विचाराधीन राहणार आहेत.
दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांबाबत अधिक चांगले निरीक्षण आणि नियंत्रण कसे करता येईल, यासाठी त्यांच्याकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. या सूचनांचा विचार केल्यानंतर अशा प्रकरणांबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाऊ शकतात.
‘India’s Got Latent’मधील वादामुळे समय रैना आणि इतरांविरोधात अनेक ठिकाणी कायदेशीर कारवाई सुरू झाली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे संबंधित फौजदारी प्रकरणांना पूर्णविराम मिळाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
