या घोषणेनंतर वाहिनीवरील काही जुन्या मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. मात्र, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ही मालिका बंद होणार नसून फक्त तिची प्रसारण वेळ बदलण्यात आली आहे.
काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनी या दोन जोड्यांभोवती फिरणारी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेम, विश्वास, नात्यांमधील संघर्ष आणि भावनिक क्षण यामुळे मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
वाहिनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मालिकेची कथा आगामी भागांमध्ये आणखी रंजक होणार आहे. त्यामुळे मालिकेचा प्रवास पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असून प्रेक्षकांना अनेक नवीन घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
सध्या मालिकेत जीवा आणि नंदिनी यांच्या आयुष्यातील भावनिक टप्पा दाखवला जात आहे. नंदिनी मातृत्वाच्या स्वप्नासाठी संघर्ष करताना दिसत आहे, तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ यांच्या आयुष्यात नव्या आनंदाची चाहूल लागली आहे.
वैद्यकीय सल्ल्यानंतर जीवा आणि नंदिनी यांनी सरोगसीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात कोणती नवी आव्हाने येणार, नात्यांची कसोटी कशी लागणार आणि त्यांचे मातृत्वाचे स्वप्न पूर्ण होणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
दरम्यान, मालिकेच्या चाहत्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही मालिका बंद होत नसून आता दुपारी 1 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मालिकेचे चाहते आपल्या आवडत्या पात्रांचा प्रवास पुढेही पाहू शकणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
