‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका जवळपास दोन वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मालिकेत राया आणि मंजिरीची जोडी मुख्य भूमिकेत होती. अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांनी या भूमिका साकारल्या. ही मालिका सोहम प्रोडक्शनची निर्मिती होती.
२७ मे २०२४ रोजी ‘येड लागलं प्रेमाचं’चा पहिला भाग प्रसारित झाला होता. सुरुवातीपासूनच मालिकेच्या कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळाले. राया हा गावगुंड असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र पुढे तो पोलीस अधिकारी आणि अंडरकव्हर एजंट असल्याचं समोर आलं.
दुसरीकडे मंजिरी तिच्या सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. राया आणि मंजिरीच्या नात्यातील चढ-उतार, कौटुंबिक संघर्ष आणि कथेत येणारे वेगवेगळे ट्विस्ट यामुळे मालिका चर्चेत राहिली.
गेल्या काही महिन्यांपासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित केली जात होती. आता जवळपास दोन वर्षांनंतर मालिकेचा निरोप होणार आहे.
मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम सेटवर एकत्र आली होती. यावेळी कलाकार आणि टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं. ‘We Are Signing Off!’ म्हणत कलाकारांनी या प्रवासाला निरोप दिला. सेटवरील या क्षणांचे फोटो आणि पोस्टही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
दरम्यान, स्टार प्रवाहकडून लवकरच ‘येड लागलं प्रेमाचं’च्या अंतिम भागाचा प्रोमो शेअर केला जाण्याची शक्यता आहे. मालिकेचा शेवट नेमका कसा होणार आणि राया-मंजिरीच्या नात्याचं काय होणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
