“बुद्धी आणि भावना यांना स्पर्श करणारं नाटक!” या घोषवाक्यासह सादर करण्यात आलेल्या पोस्टरमुळे कथानकाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नाटकात एका सर्वसामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनेनंतर बदलणारी नाती, दडलेली सत्यं आणि भावनिक संघर्ष दाखवण्यात येणार आहेत.
या नाटकात शरद पोंक्षे, सुयश टिळक आणि प्रियांका तेंडोलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमधून आधुनिक नातेसंबंधातील विविध पैलू आणि गुंतागुंतीच्या भावना प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
नाटकाचे दिग्दर्शक अजित भुरे यांच्या मते, ‘काटकोन त्रिकोण’ हे केवळ रहस्यप्रधान नाटक नाही, तर प्रत्येक कुटुंबात दडलेल्या न बोललेल्या प्रश्नांचा आणि बदलत्या नात्यांचा वेध घेणारं कथानक आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतानाच हे नाटक स्वतःच्या नातेसंबंधांकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडेल, असा त्यांचा विश्वास आहे.
या नाटकाचं लेखन विवेक बेळे यांनी केलं असून दिग्दर्शन अजित भुरे यांचं आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाशयोजना शीतल तळपदे आणि संगीत साई पियुष यांनी सांभाळलं आहे. नितीन नाईक हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.
चौरंगी एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक ऑगस्ट महिन्यात रंगभूमीवर दाखल होणार असून, त्याची प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
