काजोल म्हणाली – लग्न कायमचं नसतं; ट्विंकल खन्ना म्हणाली, लग्न म्हणजे वॉशिंग मशीन नाही!

Kajol: बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा टॉक शो ‘टू मच’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी केवळ मजा-मस्ती करत नाहीत, तर लग्न, नातेसंबंध आणि समाजाशी संबंधित मुद्द्यांवर खुल्या मनानं बोलतात.

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये “लग्नाला एक्सपायरी डेट असावी का?” हा प्रश्न उपस्थित झाला. यावर ट्विंकल खन्नाने तत्काळ उत्तर दिलं – “नाही, लग्न म्हणजे वॉशिंग मशीन नाही, ज्याला एक्सपायरी डेट असावी.” तिच्या या विनोदी उत्तरावर सगळे हसले.

मात्र, काजोलने यावर एक वेगळाच दृष्टिकोन मांडला. ती म्हणाली, “माझं मत आहे की लग्नाला एक्सपायरी डेट असावी. कारण योग्य व्यक्तीशी योग्य वेळी लग्न होईल याची खात्री नसते. त्यामुळे जर विवाहाला ‘नूतनीकरणाचा पर्याय’ (Renewal Option) असला, तर कुणालाही जास्त काळ नकोसा त्रास सहन करावा लागणार नाही.”

काजोलच्या या स्पष्ट विधानामुळे चर्चेला रंग चढला. तिने ट्विंकलला तिच्या मताशी सहमत होण्यासाठी प्रयत्न केला, पण क्रिती सेनन आणि विकी कौशल यांनी ट्विंकलच्या बाजूने मत मांडत काजोलला विरोध केला. या एपिसोडनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघींच्या मतांवर जोरदार चर्चा सुरू केली.

काहींना काजोलचा दृष्टिकोन खूप बोल्ड आणि आधुनिक वाटला, तर काहींना ट्विंकलचं हलकंफुलकं उत्तर जास्त भावलं. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी या एपिसोडचे क्लिप्स शेअर करून आपली मतं व्यक्त केली.

‘टू मच’ या शोमध्ये आतापर्यंत सैफ अली खान, अक्षय कुमार, सलमान खान, आलिया भट, आमिर खान, फराह खान, अनन्या पांडे यांसारखे कलाकार सहभागी झाले आहेत. या शोमधून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सचा खरा आणि प्रामाणिक बाजू पाहायला मिळतो.

शोतील ही चर्चा केवळ मनोरंजकच नव्हे, तर विचार करायला लावणारी ठरली. लग्न आणि नातेसंबंधांवर बॉलिवूड कलाकार किती खुल्या मनाने बोलतात, हे पुन्हा एकदा या एपिसोडमधून दिसून आलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page