४० वर्षांनंतर रंगभूमीवर परतणार ‘सखाराम बाइंडर’; सयाजी शिंदे म्हणाले – “आजच्या पिढीला हे पाहायलाच हवं!”
मराठी रंगभूमीवर एकेकाळी गाजलेलं आणि वादळ निर्माण करणारं विजय तेंडुलकर यांचं कालजयी नाटक ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर येत आहे. १९७२ साली पहिल्यांदा सादर झालेलं हे वास्तववादी नाटक आजही तितकंच धारदार आणि प्रभावी वाटतं. स्त्री-पुरुष नात्यांवरचे कडवट वास्तव उघड करत समाजाला धक्का देणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता या नाटकाचा नवा अवतार प्रेक्षकांसमोर … Read more