मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आधीच टीझर आणि गाण्यांमुळे उत्सुकता वाढलेली असताना, ट्रेलरमुळे या चित्रपटाची हवा आणखी रंगली आहे.

लाँच सोहळ्यात एक वेगळीच गोष्ट घडली. चित्रपटाच्या टीमने पूरग्रस्तांसाठी अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

ट्रेलरमध्ये श्लोक आणि मनवाच्या नात्याचा प्रवास दाखवला आहे. घरच्यांनी त्यांच्यासाठी जोडीदार शोधण्याची धडपड सुरू केली आहे. या सगळ्या गोंधळात ते दोघं आपलं प्रेम टिकवू शकतील का, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात राहतो. गोडवा, हसू आणि थोडे भावनिक क्षण अशा सगळ्या रंगांनी ट्रेलर सजला आहे.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे यांनी सांगितलं की, ही फक्त प्रेमकथा नाही, तर कुटुंबांचाही प्रवास आहे. नाती, मैत्री, आनंद सगळं यात अनुभवायला मिळेल. प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य यांच्या मते, आजच्या काळातली ही कथा असली तरी तिच्यात कुटुंबाचा गाभा आहे.

निर्माते संजय दावरा म्हणाले की, यातले प्रसंग प्रत्येक घरात घडतात. छोट्या छोट्या घटना आणि अनपेक्षित वळणं कथेला जवळीक देतात.

चित्रपटात राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी आहे. त्यासोबतच लीना भागवत आणि मंगेश कदम यांसारखे अनुभवी कलाकारही दिसतील.

हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केलं असून, निर्मिती श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page