धुरंधर स्टार अक्षय खन्नाचं वैयक्तिक आयुष्य उघड; लग्न न करण्यामागची खरी कारणं

Akshaye Khanna:धुरंधर’मधील दमदार भूमिकेनंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या कामाइतकंच त्याचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच लोकांना उत्सुक करतं. विशेष करून लग्नाबद्दलचे त्याचे विचार आणि 50 वर्षांच्या वयातही अविवाहित राहण्याचा त्याचा निर्णय पुन्हा चर्चेत आलाय.

अक्षय खन्ना सुरुवातीपासूनच लग्नाबद्दल ठाम मत मांडत आला आहे. एका जुन्या मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की लग्न तेव्हाच करावं, जेव्हा नातं खरं आणि योग्य असतं. फक्त कुटुंबाचा दबाव किंवा समाजाची अपेक्षा म्हणून लग्न करणं त्याला कधीच मान्य नव्हतं. त्याच्या मते, योग्य व्यक्ती मिळणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.

काळ जसजसा पुढे गेला, तसतसे त्याचे विचारही बदलले. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की कदाचित त्याचं लग्न होणारच नाही. “मी ‘मॅरेज मटेरियल’ नाही,” असं तो स्पष्टपणे म्हणाला होता. लग्नानंतर आयुष्याची दिशा बदलते, निर्णय सामायिक करावे लागतात आणि स्वातंत्र्यावर बंधनं येतात, हे त्याचं मत. त्याला स्वतःच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं वाटतं.

अक्षय खन्नाचा निर्णय कोणत्याही भीतीमुळे घेतलेला नाही. उलट, स्वतःचा स्वभाव आणि आयुष्यशैली ओळखून घेतलेला हा विचारपूर्वक निर्णय आहे. लग्नाचा तो आदर करतो, पण हा मार्ग सगळ्यांसाठी नसतो, हे तो प्रामाणिकपणे मान्य करतो.

सध्या अक्षय खन्ना आपल्या कामावर आणि शांत, संतुलित वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. त्याला हवी तशी जगण्याची मोकळीक मिळणं हेच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरतंय.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page