23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाने आपल्या पोस्टमधून त्यांना मेहनती आणि खंबीर व्यक्तिमत्त्व म्हणून श्रद्धांजली वाहिली.
आशा सिंह जयसवाल यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून नव्हती. त्या समाजसेविका आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणूनही कार्यरत होत्या. विशेष म्हणजे, मीना कुमारी यांच्या आवाजाची मिमिक्री करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. मनोरंजन क्षेत्रात त्यांनी ‘आशा इव्हेंट्स अँड फिल्म्स’ या कंपनीचीही स्थापना केली होती.
आशा सिंह जयसवाल यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. मात्र, बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील कृपीची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लक्षात राहिलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. या मालिकेत त्यांनी गुरु द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई असलेली कृपी साकारली होती.
त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1970च्या दशकात झाल्याची माहिती विविध अहवालांमध्ये देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक तसेच व्यक्तिरेखात्मक भूमिका केल्या. ‘महाभारत’मुळे मात्र त्यांना घराघरात ओळख मिळाली.
अभिनयासोबतच मिमिक्री क्षेत्रातील त्यांचं योगदानही महत्त्वाचं मानलं जातं. त्यांना भारतातील सुरुवातीच्या महिला मिमिक्री कलाकारांपैकी एक म्हणूनही ओळखलं जात होतं.
त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनय, मिमिक्री आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आशा सिंह जयसवाल यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
