नसरापूर प्रकरणानंतर अंकिता वालावलकरचा संताप; ‘शून्य सहनशीलतेची वेळ आली’

पुण्यातील नसरापूर प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. आता ‘बिग बॉस मराठी’मुळे चर्चेत आलेली अंकिता वालावलकर हिनेही यावर स्पष्ट आणि तीव्र भूमिका मांडली आहे.

अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकारला ठोस कायदा करण्याचं आवाहन केलं. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कोणतीही पळवाट राहू नये आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये बोलताना अंकिता म्हणाली की, राज्यात अशा घटना वारंवार समोर येत आहेत आणि प्रत्येक वेळी निषेध, मोर्चे आणि न्यायाची मागणी होते. मात्र कठोर शिक्षा आणि जलद न्याय मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. समाजात बदल घडवण्यासाठी केवळ चर्चा नव्हे, तर ठोस कृतीची गरज असल्याचं तिने नमूद केलं.

तिने सरकार आणि विरोधकांना एकत्र येऊन अशा गुन्ह्यांविरोधात ठोस कायदा तयार करण्याची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक नियम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर भविष्यात अशा घटनांना आळा बसू शकतो, असंही ती म्हणाली.

अंकिताने तिच्या पोस्टमध्येही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत. चुकीच्या गोष्टी दिसूनही गप्प राहणं योग्य नाही. मुलींची सुरक्षा हा त्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी समाजासोबतच प्रशासनानेही अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज आहे, असं तिने म्हटलं.

या पोस्टनंतर अनेकांनी अंकिताच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून, सोशल मीडियावरही कठोर कारवाईची मागणी अधिक जोर धरताना दिसत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page